सध्या रेल्वे अपघाताचे प्रमाण वाढत असून अपघात कमी न होता त्यात वाढ होत आहे. मात्र रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे कोणतीही उपाययोजना होतांना दिसत नाही. नवापूर शहर व तालुक्यात रेल्वे अपघात वाढत असून नुकताच रेल्वे अपघात घडला आहे. नवापूर तालुक्यातील शास्त्रीनगर भागातील रेल्वे गेट क्रमांक ६८ जवळ एक दुर्दैवी घटना घडली एक गुरे चारणार्या युवकाला रेल्वे गेट क्रमांक ६८ जवळ रेल्वे रुळाच्या बाजूला एक इसम गंभीर अवस्थेत आढळून आल्याने त्याने लागलीच परिसरात नागरिकांनी कळविले व लोकांनी त्या दिशेने धाव घेतली असता रेल्वे रुळाच्या बाजूला एक इसम गंभीर अवस्थेत आढळून आला त्यानी लागलीच १०८ रुग्णवाहिकेवाला कॉल करून पाचारण केले असता १०८ रुग्णवाहिकेचे चालक लाजेरेस गावीत,सोमा कोकणी आणि आबेश गावीत यांनी व स्थानिक युवकांच्या मदतीने रुग्णवाहिकेत टाकून सदर जखमी इसमाला नवापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता सदर इसमाचे नाव मिटु असुन तो सुरत हुन बंगाल जात होता असे समजते.गेल्याच आठवड्यात रेल्वेत हाणामारीमुळे एकाला आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर नंदुरबार जिल्हा रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले होते. आज ही अशी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.